जंतर-मंतरवरून सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; केंद्र सरकारवर जोरदार टीका
E R NEWS MARATHI
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला हटवणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, शांततापूर्ण उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना हटवणे पूर्णपणे चुकीचे आहे. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकार असत्य आणि हिंसेच्या मार्गावर चालत आहे दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी आणि वैद्यकीय उपचारांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांना जंतर-मंतरवरून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या दीर्घ उपोषणामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.