सांगलीत २० वर्षाच्या तरुणाची पाठलाग करून हत्या !
E R News Marathi
सांगली: स्वामी समर्थ घाटावर २० वर्षीय चैतन्य तोरणे याच्यावर कोयत्याने नऊ वार करत त्याची थरारकरीत्या हत्या करण्यात आली. सांगलीमध्ये सक्रिय असणाऱ्या एका गुंडाच्या टोळीतील सात ते आठ सदस्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. संशयित आरोपीच्या घरावर पिढीताच्या नातेवाईकांनी दगडफेक केल्याने सांगली शहरात बराच काळ तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. चैतन्य हा केटर्स मध्ये वाढपी काम करायचा मात्र त्याच्या नातेवाईकांची या टोळीसोबत भांडण होती त्याच्याच रागातून वर्चस्ववादाच्या प्रयत्नातून चैतन्याचा पाठलाग करून त्याच्यावर नजर ठेवून त्याची हत्या करण्यात आली याप्रकरणी पुढील तपास सांगली पोलिसांकडून केला जात आहे.